बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

होळी सण उद्देश





 वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे.




होळी हा रंगांचा सण म्हणून ओळखला जातो
महाराष्ट्रात ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे एक आख्यायिका आहे.




पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता.  देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. हिरण्यकश्यपूला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला.

 या कामात त्याने आपल्या बहिणीची होलिका ची मदत घेतली.  ती  क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते.  म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही.


त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.


थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्ती चे प्रतिक असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला.

त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे.

या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.

दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

!! होळी सनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


एका वडिलांनी मुलाला पत्र

जगणं, नशीब आणि अपघात ,प्रेम नक्की वाचा


एका हॉँगकॉँगच्या टीव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र त्याचा हा मराठी अनुवाद.





नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.....पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल._


_"माझ्या लाडक्या मुला.मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव...._

           _जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या._
     
        _मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार._
     
         _मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय._
   
            _माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे._ _तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस._
     
         _जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही._

       _आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा._

         _प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस._

      _अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना._

_माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा._

      _आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही._

           तुझा पप्पा

Nothing is impossible in this world


तुम्हाला हे महित आहे का?





हात्ती लहान असतो तेव्हा त्याला एका नाजुक दोरिने बांध लेल असते तो लहान असल्यामुळे तो ती नाजुक दोरी तोडू शकत नाही.
   हात्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा सुद्धा त्याच नाजुक दोरिने त्याला बांधल जात .तो ती नाजुक दोरी तोडू शकतो , पण तो ती दोरी तोडण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. तो स्वतः ला बांधून घेतो .

 तो असा का करतो?

लहानपणी हात्ती कमजोर असतो दोरी जरी नाजुक असली  तरी तो लहान असलीमुळे ती दोरी तोडू शकत नहीं. तो खुप वेळा प्रयत्न करतो पण दोरी त्याला काही टूटत नाही
तो गैरसमझ(Wrong Beliefs)
करुण घेतो की ती दोरी आपण कधीही तोडू शकत नाही व त्या दोरिचा नाद तो सोडून देतो




हात्ती मोठा झाल्यावर सुद्धा हाच विचार त्याच्या डोक्यात असतो त्या मुळे तो ती दोरी तोडण्याचा प्रयत्न करत नाही.तो मोठा व जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी एका नाजुक दोरीला स्वतः ला बांधून घेतो.

आपल्या आयुष्यात पण आपण हेच करतो  आपण आपल्या मनात काही (आपण आपल्या विचारांचे गुलाम झालेलो यासतो )
 गैरसमज़ केलेले असतात त्यामुळे प्रयत्न कारणं सुद्धा आपण सोडून देतो.

जगात अशक्य काहीच नाही
 Nothing is impossible in this world

आपण ते सर्व करू शकतो ज्याचा आपण विचार करतो
तुमचे विचार च तुम्हाला घडवतात

एक लक्षात घ्या

“हम वो सब कर सकते है जो हम सोच सकते है और हम वो सब सोच सकते है जो आज तक हमने नहीं सोचा”


 (We become, what we think)| “असंभव” या “नामुनकिन” (Impossible) हमारी सोच का ही परिणाम है|

“हमारे साथ वैसा ही होता है जैसा हम मानते है और विश्वास करते है|”




गरुड भरारी

फांदी मोडून तर बघा!

 एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.
   त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की 'जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.'

   हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.

   शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, "काय रे, उडाला काय गरुड?" तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला!

   त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे कसे केलेस?"
   तेव्हा शेतकरी म्हणाला, "मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!"

   आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात!

   मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!

   अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!

   ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!
मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो ते!

Marathi inspirational




प्रेरणा कशास म्हणतात

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!

आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!*

बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!*

यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!

मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?*

तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!*

शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?*

तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?*

आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?

हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!*

मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!*

सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!*

आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!




आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!

भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!

पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!

पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!

माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?

कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?*

वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?*

लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?
आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?
निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!*
प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!

शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!

आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!


मराठी सुदंर विचार





गोड मधं बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही…
त्यासाठी सावधान रहा…
कारण…
जास्त गोड बोलणारे पण इजा पोहचवु शकतातं…


मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


परीस्थिती प्रमाणे बदलणारे मित्र
 सांभळण्या पेक्षा परीस्थिती बदलविणारे”ल मित्र सांभाळा …………
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.





मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला तरी ते लाख रूपये होत नाही.
तसेच तुम्ही आहात
मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही….



मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार



एक पेन चुक करू शकतो…,
पण.,
एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,
कारण
तीचा partner (खोडरबर) तीच्या सोबत असतो. ..
तो तिच्या सर्व चुका सुधारतो…म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा..
जो आपल्या चुका सुधारेल…..

मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..
गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..
डोळे मागे न देता पुढे दिले आहेत..!!


मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.
काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी ― सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी…..!

मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


जर तुम्ही पाहिलेले स्वप्न
पूर्ण नसतील होत तर
तुमच्या कामाची पद्धत बदला,
तुमचे तत्व नाही,
कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही…..

मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार

जीवन हे हार्मोनियम सारखे असते.
सुखाच्या पट्टया पांढऱ्या,
दु:खाच्या पट्टया काळ्या.
पण गमंत म्हणजे
दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय
सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही..!!!!




मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा ।दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा,
आणि व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा ।”

मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो
तर ….
आपल्या चुका मान्य करायला काळीज
असाव लागतं…
नेहमी एक “Special” म्हणून रहावं,
पण कोणाच्या आयुष्यात “Option” म्हणून राहू नये…
“कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा ” विजय ” ठरतो ,
…पण अनेक संकटांशी सामना करून
मिळालेला विजय ” हा इतिहास घडवतो…”


मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार

जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील…!!
कारण relations मध्ये “विश्वास” अन मोबाइलमध्ये “Network” नसेल तर लोक “Game” खेळायला सुरुवात करतात….!!!!


मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार

लाखात एक वाक्य

“माणुस स्वत:च्या चुकांसाठी
उत्तम ‘वकील’ असतो,
परंतु…दुसर्यांच्या चुकांसाठी
सरळ ‘न्यायाधीश’ च बनतो…




मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार

आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो…
इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो..

अन् एकदा तुम्ही या खेळात पारंगत झाला की ,
प्रत्येकजण तुम्हाला हरविण्यासाठी खेळतो…”


मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


स्वर्गात सर्व काही आहे,
परंतु मृत्यू नाही,
गीतामध्ये सर्व काही आहे,परंतु खोट नाही,
जगात सर्व काही आहे,
परंतु समाधान नाही,
आणि आज माणसांमध्ये
सर्व काही आहे,
परंतु धीर नाही.
जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो,
आधार कुणी नाही देत परंतु
धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . .
“माझं” म्हणून नाही.
”आपलं” म्हणून ‘जगता’ आलं पाहिजे…
‘जग’ खुप ‘चांगले’ आहे. फक्त ………”चांगले वागता” आलं पाहिजे..!!


मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार


मला आवडलेला एक marati sms

लोकांच्या अंगात देवी,भुतच का येतात शिवाजी महाराज ,सम्राट अशोक ,सावित्री बाई फुले ,
न्युटन आयझॅक,यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत?
जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल….

मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार

“चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो………
पण त्यांची कधी साथ सोडत नाही…….
आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो,……
पण त्यांना साथ कधी देत नाही……..
ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही ‘चांगले’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘कठीण’ गोष्टीने होते ..आणि नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!

मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार



प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात…
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही…
पण त्यांचा उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो…




मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार

“मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते ,”मी” श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण. फक्त “मीच” श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. ”






मराठी सुन्दर विचार, मराठी सुविचार, मराठी प्रेरणादायी विचार

जीवनातील सगळ्याच समस्या देवाच्या भरवशावर सोडून चालत नाही,
कुणास ठाऊक त्या समस्या सोडवण्याकरिता देव तुमच्या भरवशावर बसला असेल..


कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता समझतात



एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते.
अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही?

लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला......

हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक
अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...

मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.

मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.


दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.

अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.

पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.


आता अर्जून अगदी दमून गेला होता.

पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.


शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!

आता यापुढे मी काम करू शकत नाही.
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......




या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले की.....

या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत.



एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.

लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.

हा विचार आपल्या मनात का आला नाही.....

या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला.....


अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!


तू गर्वाने प्रत्येक.......
गावक-याला सोने वाटू लागलास.

जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!


कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.

त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

आपले कुणी कौतुक करतंय.....
गुणगान गातंय......
हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....
शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....
म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.
कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............

*"काय चुकलं"* *हे शोधायला हवं,*
*पण आपण मात्र* *"कुणाचं चुकलं"* *हेच शोधत राहतो..*

 *आपली माणस मोठी करा,*
*आपोआप आपणही मोठे होऊ...*

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती




       इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये
मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला.



त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली. दोन कॉफी..
एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीवर बसणाऱ्यांसाठी.
         माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून दिली. बिल मात्र दोन कॉफीचे होते. त्या व्यक्तीने दोन कॉफीचे बिल दिले आणि तो निघून गेला. लगेच वेटरने एक चिठ्ठी भिंतीवर चिटकवली आणि ओरडला,
एक कॉफी ऑफ कप.
         आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आणखी दोघेजण तिथे आले. त्यातील एकाने तीन कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनी एक-एक कॉफी घेऊन तीन कॉफीचे पैसे दिले. मग पुन्हा वेटरने काहीतरी लिहिलेला कागदाचा एक तुकडा तिथे चिटकवला आणि पुन्हा तेच ओरडला. आमच्यासाठी हे एक नवलच होते. आम्ही कॉफी संपवली आणि बिल देऊन बाहेर पडलो.
         काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच कॉफी शॉपमध्ये जाण्याचा योग आला. आम्ही कॉफीचा स्वाद घेत असतानाच एक गरीब दिसणारी व्यक्ती आली आणि समोरील टेबलावर बसली. त्या व्यक्तीने वेटरला सांगितले की,

वन कप ऑफ कॉफी फ्रॉम द वॉल.
        त्या वेटरने नेहमीच्याच अदबीने त्या व्यक्तीला कॉफी दिली. त्या व्यक्तीने कॉफीचा आस्वाद घेतला आणि बिल न देताच ती व्यक्ती निघून गेली.
         हे सगळे पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. तेवढ्यात त्या वेटरने

भिंतीवर चिटकवलेला कागदाचा तुकडा काढून डस्टबिनमध्ये टाकून दिला.

 या शहरातील गरिबांनाही कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी कुणीतरी काळजी घेणारे  होते. ती काळजी अतिशय आदराने आणि कुणालाही कळणार नाही असे पद्धधतीने घेतली जात होती. त्या गरीबाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.

        नकळत आमच्या डोळ्यात अश्रूंचा थेंब आला. कारण ज्या गरिबाला कॉफी प्यावीशी वाटली होती तो खिशात पैसे नसताना आला होता.  त्याला कुणाकडेही हात पसरावे लागले नाहीत किंवा कुणाकडेही याचना करण्याची वेळ आली नाही. एवढेच काय हे दान कुणी दिले याचीही त्याला कल्पना नव्हती. त्याचवेळी आपले दान कुणाला जाणार याची कल्पना नसते; पण त्याला नक्की ठाऊक असते की हे सत्पात्री दान आहे.

   मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत


Author: unknown

तुमच success तुम्ही ठरवा

||यशस्वी होण्यासाठी दृष्टी नाही तर दृष्टीकोण चांगला पाहिजे||



      



  आंधळा माणूस एका मंदिरात गेला,
मंदिरात दर्शन घेत असलेले
लोक त्याला बघून म्हणाले,
दर्शनाला आलाय देवाला
 बघु शकणार का?
    आंधळा म्हणाला,
"काय फरक पडतोय माझा"
देव तर मला पाहतोय ना...

"दृष्टी नाही तर दृष्टीकोण चांगला पाहिजे"




  काचेला पारा लावला की,
  आरसा तयार होतो. पण.
  लोकांना आरसा दाखवला की,
  त्यांचा पारा चढतो.
  "आरसा तोच असतो"
  फक्त त्यात हसत पाहिले की,
  आपण आनंदी दिसतो,
  आणि रडत पाहिले की,
  आपण दु:खी दिसतो.
  तसेच जीवन ही तेच असतं,
  फक्त त्याच्याकडे आपला
  पहाण्याचा दृष्टीकोन त्याला
  आनंदी किंवा दु:खी बनवतो.
  म्हणुन. दृष्टीकोन महत्वाचा आहे.
---------------------------------------





         छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही...
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते...
कारण...
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात...
पण...
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो.
---------------------


जिभेचं वजन
 खुप कमी असतं..
पण तिचा तोल सांभाळणं
 खुप कमी लोकांना जमतं.  
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....
हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....
_______________________________ 

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.
----------------------------------------

शुभ सकाळ । GOOD MORNING |
WISH YOU A ROCKING DAY



beautiful interpretation of Karma and Bhagya


एक पान वाला था। जब भी पान खाने जाओ ऐसा लगता कि वह हमारा ही रास्ता देख रहा हो। हर विषय पर बात करने में उसे बड़ा मज़ा आता। कई बार उसे कहा की भाई देर हो जाती है जल्दी पान लगा दिया करो पर उसकी बात ख़त्म ही नही होती।

एक दिन अचानक कर्म और भाग्य पर बात शुरू हो गई।
तक़दीर और तदबीर की बात सुन मैनें सोचा कि चलो आज उसकी फ़िलासफ़ी देख ही लेते हैं। मैंने एक सवाल उछाल दिया।

मेरा सवाल था कि आदमी मेहनत से आगे बढ़ता है या भाग्य से?
और उसके जवाब से मेरे दिमाग़ के सारे जाले ही साफ़ हो गए।
कहने लगा,आपका किसी बैंक में लाकर तो होगा?
उसकी चाभियाँ ही इस सवाल का जवाब है। हर लाकर की दो चाभियाँ होती हैं।
एक आप के पास होती है और एक मैनेजर के पास।
आप के पास जो चाभी है वह है परिश्रम और मैनेजर के पास वाली भाग्य।
जब तक दोनों नहीं लगतीं ताला नही खुल सकता।
आप कर्मयोगी पुरुष हैं ओर मैनेजर भगवान।
अाप को अपनी चाभी भी लगाते रहना चाहिये।पता नहीं ऊपर वाला कब अपनी चाभी लगा दे। कहीं ऐसा न हो की भगवान अपनी भाग्यवाली चाभी लगा रहा हो और हम परिश्रम वाली चाभी न लगा पायें और ताला खुलने से रह जाये ।


This is a beautiful interpretation of Karma and Bhagya

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...